‘स्वच्छ, सुंदर, हरित पथांचे आधुनिक ठाणे’ असे गोडवे गायले जात असले तरी शहराचा खरा चेहरा हा असा आहे. गेल्याच महिन्यात महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील या महत्त्वाच्या महानगरातील तब्बल ८० टक्क्यांहून अधिक रहिवासी अनधिकृत वस्त्यांमध्ये राहतात. या वस्त्या केवळ बेकायदाच नाहीत, तर धोकादायकही आहेत. खाडीकिनारी भराव टाकून, डोंगरमाथ्यावर अगदी दाटीवाटीने उभारलेल्या या घरांमध्ये राहणारी लाखो माणसे डोक्यावर भीतीची टांगती तलवार घेऊनच जगत आहेत. साऱ्या सृष्टीसाठी जीवनदायी ठरणारा पावसाळा येथील रहिवाशांसाठी कर्दनकाळ ठरतो. पावसाळ्यात यापैकी काही इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात. त्याच्या ढिगाराखाली सापडून कैक लोक मृत्युमुखी पडतात तसेच जखमीही होतात. मात्र अशा रीतीने मृत्यूच्या दारात जगण्याची जोखीम पत्करलेल्या या रहिवाशांची करुण कहाणी मागच्या पानावरून पुढे सुरूच राहते.
छाया-गणेश जाधव

ditch that glass of ice cold water during summer
उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पीत आहात? आजचं सोडा ही वाईट सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण…
Chef Vikas Khanna's favorite kairicha thecha
शेफ विकास खन्ना यांचा आवडता कैरीचा ठेचा खाल्ला आहे का? नसेल तर एकदा खाऊन पाहा, ही घ्या रेसिपी
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
worlds clearest water
काचेसारखे पारदर्शक ‘या’ तलावाचे पाणी; पण स्पर्शालाही बंदी! कारण काय…?