रेल्वे स्थानकांतील समस्या व त्यामुळे घडणाऱ्या घटनांनी रौद्ररूप धारण केले असले तरी त्याबाबत उमटणाऱ्या पडसादांची कितपत दखल घेतली जाते, हा प्रश्न प्रशासनाला वारंवार विचारावा लागतोच. सध्या हा प्रश्न नायगावकरांना फार प्रखरतेने भेडसावतोय. स्थानकात इतर समस्या ठाण मांडून बसल्या असताना सकाळी विरारवरून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये व संध्याकाळी चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांना चढू दिले जात नाही. दररोज हा अन्याय सहन करताना लोकल रद्द झाल्याची घोषणा झाल्यावर वैतागलेल्या प्रवाशांच्या सहनशक्तीचा कडेलोट होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम रेल्वेवरील विरार लोकलच्या गर्दीत मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांची भर टाकणारे स्थानक म्हणून नायगाव स्थानक नावारूपाला येत आहे. पूर्वी येथे प्रवाशांची संख्या जास्त नव्हती, पण शहरातील काँक्रीटीकरणामुळे येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली. वसईपेक्षा सोयीचे स्थानक म्हणून गर्दीचा ओढा नायगाव स्थानकाच्या दिशेने आणखीच वाढला. खरतंर वाढती गर्दी आणि समस्या पाहता प्रशासनाने त्याप्रकराच्या सुविधा उपलब्ध करणे गरजेचे होते परंतु, याकडे सपशेल कानाडोळा करण्यात आला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commuters facing various problem at naigaon station
First published on: 24-10-2017 at 01:21 IST