भावनाविवश होऊन नव्हे, तर हळव्या भावनांना थांबवून रेडीओ जॉकी कार्यक्रम सादर करावा लागतो, असे मत रेडीओ जॉकी गणेश आचवल यांनी व्यक्त केले.
आचवल तसेच त्यांचे सहकारी मित्र रेडीओ जॉकी रश्मी वारंग व मयुरेश शिर्के यांनी ‘मनस्पर्शी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून बदलापूरात रसिकांशी संवाद साधला.
येथील ‘सुहृद संस्थे’ने जागतिक महिला दिन आणि प्रथम वर्धापनदिनानिमित्त काटदरे मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. या वेळी ‘ग्रंथसखा’चे श्याम जोशी, काका गोळे फाऊंडेशनचे आशिष गोळे आदी मान्यवर उपस्थित होते. रश्मी वारंग म्हणाल्या की, रसिकांना बोजड वाटणारा विषय हलका करून सांगणे यात खरे कौशल्य पणाला लागते.
निवेदनात उत्स्फूर्तता, अचूकता लागते, असे मयुरेश शिर्के म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2015 रोजी प्रकाशित
रेडीओ जॉकींचे ‘मनस्पर्शी’ अनुभवविश्व
भावनाविवश होऊन नव्हे, तर हळव्या भावनांना थांबवून रेडीओ जॉकी कार्यक्रम सादर करावा लागतो, असे मत रेडीओ जॉकी गणेश आचवल यांनी व्यक्त केले.
First published on: 11-03-2015 at 08:35 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radio jockey