ठाणे : शहर रंगवण्यासाठी ठाणे महापालिका एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र महापालिकेच्या पडले येथील शाळेत शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा बेरंग झाला असल्याची बाब उघडकीस आली आहे. दिवा येथील पडले गाव भागातील महापालिकेच्या शाळेत पहिली ते चौथीच्या १०५ विद्यार्थ्यांना केवळ एकच शिक्षक शिकवत असून या शाळेत मागील तीन महिन्यांपासून एकही पूर्णवेळ शिक्षक नसल्याचे समोर आले. आमदार संजय केळकर यांनी याबाबत संताप व्यक्त करत तत्काळ पूर्णवेळ शिक्षक नेमण्याची सूचना प्रशासनाला केली आहे.

हेही वाचा >>> सनद प्रकरणावरून उल्हासनगर पालिकेचीच कोंडी; अपुऱ्या माहितीवरून दिलेल्या पत्रामुळे पालिकेची अडचण

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

दिवा-शीळ हद्दीतील पडले गावातील शाळा क्र. ९० मध्ये आढळून आले आहे. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात आधारकार्ड शिबीर आयोजित केले होते. त्यावेळी ही बाब उघडकीस आली. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे १०५ विद्यार्थी शिकत असून गेल्या तीन महिन्यात येथे एकही पूर्णवेळ शिक्षक नाही. केवळ एकच शिक्षक येथे कार्यरत असून या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी पेलताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी येथील एकमेव शिक्षकांशी बोलून अडचणी जाणून घेतल्या तसेच विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. शिक्षक नसल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले असल्याची भावना येथील नागरिकांनीही बोलून दाखवली. केळकर यांनी याबाबत संताप व्यक्त करून महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांच्याशी संपर्क साधला आणि तत्काळ या शाळेत आवश्यक शिक्षक वर्ग नियुक्त करण्याची तसेच सोयी – सुविधा पुरवण्याची सूचना केली.

शहरात रंगरंगोटीसाठी १०३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे, याचा आनंदच आहे, पण शाळांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बेरंग करू नका.

– संजय केळकर, आमदार.