राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून दिलेली आश्वासने आणि त्या आश्वासनांसंदर्भातील सध्याची आकडेवारी पवार यांनी पत्रकारांसमोर मांडली. पवार यांनी बिल्कीस बानो, केंद्रीय यंत्रणांचा वापर यासारख्या विषयांवरुनही केंद्रातील भाजपा सरकारला लक्ष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आव्हाडांनी राज्यात ज्या पद्धतीने काम केलं ते पक्षाच्या दृष्टीने, जनहिताच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल झालं. आज ज्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सुत्रं आहेत हे सगळ्या एका विचाराचे आहेत. लोकांना काही विश्वास देण्याच्या संबंधातील त्यांची भूमिका दिसत नाही,” असं म्हणत पवारांनी भाजपाकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचं म्हटलं आहे. तसेच यापुढे पवार यांनी केंद्रामध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यापासूनच्या आश्वासनांचा पाढाच वाचून दाखवला. तसेच सध्याच्या स्थितीला त्या आश्वासनांचं काय झालं आहे याबद्दलही पवार यांनी मिहिती दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar slams modi government says people havent seen acche din scsg
First published on: 29-08-2022 at 16:06 IST