उष्ण, दमट वातावरणामुळे नागरिक हैराण

ठाणे : जिल्ह्यात गेल्या आठवडय़ाभरापासून पावसाने दडी मारली असल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. उष्ण आणि दमट वातावरणामुळे उकाडा वाढला असून नागरिकांचे हाल होत आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे अनेक नागरिकांना सर्दी, खोकला आणि ताप या आजारांची लागण झाली असून या काळात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
nashik, Unseasonal Rain, Damages Crops, 107 Villages, Nashik District, farmers, nashik Unseasonal Rain, 729 hecters, surgana, trimbakseshwar, baglan, peth, nashik, nashik news, unseasonal rain nashik
अवकाळीचा नाशिक जिल्ह्यातील ७२९ हेक्टरवरील पिकांना फटका
Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
Average temperature in Thane district at 42 degrees Celsius
मंगळवार ठरला उष्णवार! ठाणे जिल्ह्यात सरासरी तापमान ४२ अंश सेल्सियसवर

गेल्या आठवडय़ाभरापासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने तापमानात वाढ झाल्याचे दिसत असून आठवडय़ाभरात ४ ते ५ अंश सेल्सियसने तापमान वाढले आहे. ठाणे जिल्ह्यात मागील आठवडय़ात ३० अंश सेल्सियसपर्यंत तापमान होते. मात्र, या आठवडय़ात जिल्ह्याचा पारा वाढला असून तापमान ३५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. त्यातच अधूनमधून ढगाळ वातावरण तसेच उन्हाची वाढलेली तीव्रता यांमुळे जिल्ह्यात सध्या दमट आणि उष्ण वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे उकाडा जाणवू लागला असून नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत.   या वातावरणामुळे जिल्ह्यात संसर्गाचे प्रमाण वाढले असून सर्दी, खोकला आणि ताप हे आजार जास्त प्रमाणात होत आहेत. तसेच सध्या मलेरिया, डेंग्यू यांच्या रुग्णामध्येही वाढ होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणेचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी दिली.

जिल्ह्यातील तापमान

शहर           तापमान

ठाणे                ३१

डोंबिवली        ३४

कल्याण         ३५

भिवंडी          ३३

शहापूर          ३४

उल्हासनगर  ३२

अंबरनाथ     ३३

बदलापूर       ३२

(अंश सेल्सिअसमध्ये)