भिवंडी शहरातून उद्या, रविवारी ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणूक काढण्यात येते. यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. ठाणे शहर वाहतूक विभागातर्फे करण्यात आलेले हे बदल उद्या दुपारी १२ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत असणार आहेत. अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त गणेश गावडे यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> पुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद

तर कॉटरगेट मस्जिद-रामभवन हॉल-चाँदतारा मस्जिद, बुबेरे हॉटेल-पटेल मस्जिद उजव्या बाजुने पांजरपील चौक मार्गे वंजारपाटी नाका ममता हॉस्पिटलच्या बाजूने डावीकडे मामा भांजा दर्गा या मार्गावरून मिरवणूक निघणार आहे. यामुळे मिरवणूक मार्गावर तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

असे आहेत वाहतूक बदल

वाडा रोड मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तर या जड – अवजड वाहनांना अंबाडी नाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ ने अथवा बृहन्मुंबई महानगरपालिका पाईपलाईने मार्गे इच्छित स्थळी जात येणार आहे. वाडा रोडने नदीनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पारोळ फाटा (नदीनाका) येथे प्रवेश बंद करण्यात येणार असून यातून हलक्या वाहनांना पारोळ फाटा येथून खोणीगांव, तळवली फाटा, कांबारोड मार्गे वसई रोड येथून कारीवली मार्गे अथवा विश्वभारती फाटा येथून गोरसईगांव मार्गे इच्छित स्थळी पोहचता येणार आहे.

हेही वाचा >>> कल्याण मध्ये सोनाराची कारागिराकडून फसवणूक

वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना एसटी बससह धामणगांव, जांबोळी पाईपलाईन नाका व चाविंद्रा नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तर ही वाहने धामणगांव पाईपलाईन मार्गे वाड्याकडे जातील. तसेच एस. टी. बसमधील प्रवासी चाविंद्रा जकात नाका या ठिकाणी उतरवतील व तेथून प्रवाशी घेवून बस वळवून इच्छित स्थळी जात येणार आहे.

ठाणे, कल्याणकडून जुना ठाणे आग्रा रोडने वाडा बाजूकडे व चाविंद्रा मार्गे नाशिकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना बागेफिरदोस मस्जिद पेट्रोल पंप येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. तर या मार्गे जाणाऱ्या वाहनांना बागेफिरदोस पेट्रोल पंप येथून नागाव रोडने जात येणार आहे.

राजनोली चौकातून भिवंडी शहरात येणाऱ्या एस.टी., के.डी.एम.टी. बस, जड अवजड वाहने, कार, रिक्षा, दुचाकी, मध्यम व हलक्या वाहनांना राजनोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. तर एस.टी., के. डी.एम.टी. बसेस, शिक्षा या रांजनोली नाका येथे प्रवाशी उतरवतील व तेथूनच प्रवाशी घेऊन इच्छित स्थळी जाता येणार आहे. तसेच जड-अवजड, मध्यम व हलकी वाहने राजनोली नाका येथून मुंबई-नाशिक बायपास हायवे वरील मानकोली नाका येथून अंजुर फाटा, वसई रोड किंवा ओवळी खिंड येथून ओवळी गाव, ताडाळी जकात नाका कामतघर किंवा पाईपलाईन मार्गे जातील.