ती एका लहानशा गावातून आलेली…धावणं हाच तिचा धर्म…नुकतंच तिने सुवर्णपदक पटकावत देशाची मान उंच होईल अशी कामगिरी केली…मात्र तिच्याबाबत माहिती शोधताना भारतीयांना तिच्या जातीतच जास्त स्वारस्य असल्याचे नुकतेच लक्षात आले आहे. या मुलीचे नाव आहे हिमा दास. आसाममधील नागाव या गावी राहणाऱ्या या तरुणीने आपल्या कामगिरीने भारतीयांची मने जिंकली. मात्र इतकी उंची कामगिरी करुनही तिच्या कामगिरीबाबत सर्च न करता भारतीय लोक गुगलवर तिची जात शोधण्यात स्वारस्य मानत आहेत. त्यामुळे भारतीयांची पुरातन मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे.

हिमा दासबाबतच्या सर्चमध्ये गुगलवर तिची जात सर्वाधिक शोधला जात असल्याचे समजत आहे. या सर्चवरुन ट्विटरवर जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांनी भारतीय मानसिकतेबाबत आपला राग व्यक्त केला आहे. भारत एक दु:खी देश आहे, तिची जात सर्च होणे ही खेदाची बाब आहे, तिची कामगिरी न पाहता जात कशी शोधू शकतात असे प्रश्न नेटीझन्सनी सोशल मीडियावर विचारले आहेत. लाखांमध्ये लोकांनी तिची जात सर्च केल्याचे गुगल दाखवत आहे. त्यामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना तिची जात सर्वाधिक सर्च होणे ही अतिशय खेदाची गोष्ट आहे असे म्हणावे लागले.

https://twitter.com/swatisingh1995/status/1018156648559341569

https://twitter.com/Gauravsomwanshi/status/1018468599390851072

https://twitter.com/swarajpb/status/1018375628339466240

IAAF वर्ल्ड अंडर २० अॅथेलॅटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत तिने ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला ठरली. १८ वर्षीय हिमाने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करत ही स्पर्धा जिंकली. देशाची मान उंचावणाऱ्या हिमा दासच्या मदतीसाठी केंद्र सरकार आता पुढे सरसावले आहे. क्रिडा मंत्रालयाने तिला आर्थिक मदत जाहीर केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हिमाला मदतीचा हात देण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.