लोकसभा निवडणुक २०२४च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या राजकिय पक्ष व नेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. या काळात कोणत्याही उमेदवाराला सरकारी यंत्रणा किंवा मतदारांना पैशाचे अमिश दाखवू शकत नाही. दरम्यान लाइटहाऊस जर्नालिझमला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली जात असल्याचे आढळले. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, आचारसंहिता लागू झाल्याने ‘मंत्रालय’द्वारे व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर इत्यादी प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवणार आहे. तसेच सरकार किंवा कोणत्याही प्रमुख व्यक्तीच्या विरोधात सोशल मीडिया पोस्टवर कारवाई केली जाईल असा दावा केला आहे. तपासादरम्यान हा दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Sharad Nene यांनी  वायरल दावा आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

PM narendra Modi about changing Constitution India Bloc Rahul Gandhi loksabha election 2024
“स्वत: आंबेडकर आले, तरी घटना बदलू शकत नाही”; या निवडणुकीत राज्यघटनेच्या मुद्यावरून एवढा वादंग का होतोय?
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
Gaurav Gogoi alleges that BJP wants a Russian-style oligarchy
“रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप

इतर वापरकर्ते देखील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समान पोस्ट शेअर करत आहेत.

https://www.facebook.com/groups/632182062360303/posts/731510012427507/

https://www.facebook.com/groups/839912463476705/posts/1587152582086019/

हेही वाचा – भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांना वकिलांनी भररस्त्यात चोपलं? लोकांना झाला आनंद, Video मध्ये नेमकं काय घडलं?

तपास:

साधे Google कीवर्ड शोध वापरून आमचा तपास सुरु केला.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही बातम्या आढळल्या नाहीत.

त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ‘राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचारसंहिता’ तपासली.

https://www.eci.gov.in/mcc/

आदर्श आचारसंहितेच्या सूचनांचे संकलन देखील तपासले. आम्हाला कोणतेही विधान आढळले नाही ज्यामध्ये सरकार किंवा राजकीय नेते किंवा पक्षांबद्दल पोस्ट शेअर करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे सुचवले आहे.

Click to access Compendium_MCC.pdf

एक अहवाल सापडला ज्याने सुचवले की, आदर्श आचारसंहिता आणि त्याचे पूर्व-प्रमाणित राजकीय जाहिरात नियम सोशल मीडियावर देखील लागू होतील.

https://economictimes.indiatimes.com/news/elections/lok-sabha/india/model-code-political-ad-rules-will-apply-to-social-media-too/articleshow/68350634.cms?from=mdr

हेही वाचा –ममता बॅनर्जींच्या कपाळावर झालेली ‘ती’ जखम खोटी? समोर आली फोटोंमागची खरी बाजू

तपासाच्या पुढच्या टप्प्यात नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रविंदर सिंगल यांच्याशी संपर्क साधला ज्यांनी सांगितले की,” सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत विभागाला अशी कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही.”

निष्कर्ष: सरकार किंवा राजकीय व्यक्तींच्या विरोधात लिहिणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी ‘मंत्रालय’ सोशल मीडिया खात्यांवर लक्ष ठेवत नाही, हा
व्हायरल दावा खोटा आहे.