अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून या हल्ल्याचा निषेध करतानाच काश्मिरी जनतेविषयी एक ट्विट केले आणि ट्विटर राजनाथ सिंहाविरोधात संतापाचा उद्रेक झाला आहे. यंदा राजनाथ सिंहाचा पराभव नक्की अशा शब्दात ट्विटरकरांनी राजनाथ सिंहांवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर अमरनाथ यात्रेविषयी ट्विट केले होते. अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याची काश्मीरी जनतेने निंदा केलीय. असं करून काश्मीरी जनतेने त्यांच्यातील कश्मिरीयत अजूनही जिंवत ठेवलीय’ अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलंय. मात्र या ट्विटवरुन युजर्सनी सिंह यांनाच ट्रोल करायला सुरुवात केली.  गृहमंत्र्यांकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नाही. त्यापेक्षा आम्ही इस्लाम धर्म स्विकारलेला बरा असे ट्विट एकाने केले. तर दहशतवाद्यांनी हल्ला करावा अशी परिस्थिती कश्मीरी लोक निर्माण करतात असंही ट्विट त्यांनी केलंय. अशा अनेक टिका सोशल मीडियावर पाहायला मिळाल्यात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister rajnath singh get trolled on social media after amarnath attack
First published on: 11-07-2017 at 19:17 IST