जिद्द आणि मेहनत करायची तयारी असेल तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. गडचिरोलीमध्ये राहणाऱ्या १७ वर्षांच्या आंचल राऊतने हे दाखवून दिले. कालच बारावीचा निकाल लागला. या निकालात मुलींनी बाजी मारली तेव्हा सगळ्या मुलींचे कौतुक करावं तेवढं कमी आहे, पण याचबरोबर आंचलचही कौतुक करावं लागेल. दोन्ही हात नसतानाही तिथे बारावीच्या परीक्षेत ६३ % गुण मिळवले.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, आंचल कॉलेजपासून खूप लांब राहायची, घर ते कॉलेज हे अंतर एसटीने होतं ४० मिनिटांचं. पण तरीही न चुकता वेळेआधी आंचल कॉलेजला यायची. तिला दोन हात नसल्याने ती पेपर कसा लिहिणार? अभ्यास कसा करणार? असा प्रश्न शाळेतल्या शिक्षकांना असायचा पण तिने सगळ्यांना खोटं ठरवतं, बारावीत अपेक्षेपेक्षाही चांगलं यश मिळवलं. कॉलेजमध्ये १४० हून अधिक विद्यार्थी शिकत होते, पण या सगळ्यांसोबत तेवढीच मेहनत करून तिने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली.
वाचा : कॅन्सरग्रस्त मुलाने बारावीत मिळवले ९५ % गुण
वाचा : जुळ्या बहिणींना बारावीच्या परीक्षेत गुणही अगदी ‘सेम टू सेम’
आंचल गरीब कुटुंबातून आली आहे. तिचे बाबा शेतकरी आहेत. आंचलला शिकून घरची परिस्थिती बदलायची आहे. तिला आयएएस ऑफिसर बनायचं आहे. आंचलला हात नसलेले तरी जिद्द, मेहनत चिकाटीचे पंख लावून तिला आपला स्वप्नांचा डोंगर सर करायचा आहे आणि या ती नक्कीच यशस्वी होईल यासाठी सगळ्यांकडून तिला भरभरून शुभेच्छा!