गुवाहाटी,आसाममधील दोन लहान मुलांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना एका गंभीर चिंतेबदल लिहायची नितांत गरज वाटली. आणि ही चिंता काय आहे हे वाचून तुम्हाला नक्कीच हसू येईल. चिंता म्हणजे दात पडणे आणि त्यामुळे त्यांचे आवडते पदार्थ खायला न येणे हे आहे. होय, आपण ते बरोबर वाचले! दात वाढत नसल्याने सहा वर्षीय रईसा रवझा अहमद आणि पाच वर्षीय आर्यन अहमद यांना स्वतःला खूपच कसे तरी वाटत आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या समस्यांबद्दल उच्च अधिकाऱ्यांना संबोधित करण्याचा निर्णय घेतला. फेसबुकवर या दोन मुलांची पत्रे असलेली एक पोस्ट आता व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्र फेसबुकवर केलं पोस्ट

मुलांचे काका मुख्तार अहमद यांनी शेअर केलेली पोस्ट वाचून आनंद वाटेल. दोन मुलांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये पीएम मोदी आणि सीएम सरमा यांचा उल्लेख आहे आणि त्यांना ‘कृपया आवश्यक ती कारवाई करा’ अशी विनंती केली आहे. ते त्यांचे आवडते पदार्थ खाऊ शकत नाहीत हे देखील पत्रांमध्ये नमूद केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I cant eat because i lost my teeth assam siblings wrote a letter directly to narendra modi and himanta biswa sarma viral story ttg
First published on: 29-09-2021 at 12:11 IST