सध्या राजस्थानमधील एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. नवरी ही लग्नाच्या आधीच भर मांडवातून पळून गेली. त्यानंतर नवरदेवाने काय केलं असावं, याचा तुम्ही विचारही केला नसेल. नवरदेवाने जे काही केलं ते वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

हे प्रकरण राजस्थानमधील पाली येथील सैणा गावातील आहे. येथे एका लग्नात नवरी फरार झाली. नवरदेव मांडवात वरात घेऊन पोहचला. सर्व पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या विधी पूर्ण केल्या. जेव्हा सकाळी फेरे घेण्याची वेळ आली तेव्हा तब्येत ठीक नसल्याचं कारण देत नवरी खोलीत गेली आणि मांडवातून पळाली. या संपूर्ण प्रकरणानंतर नवरदेवाने काय केले असावे, असा तुम्हाला प्रश्न पडेल पण घरी जाणार तर सोबत नवरीला घेऊनच जाणार, अशी नवरदेवाने अट ठेवली.

Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

हेही वाचा : Viral Video : बुरखा घालून गर्लफ्रेण्डला भेटायला गेला अन्… पुढे काय झालं, पाहा व्हिडीओ

या प्रकरणानंतर नवरीच्या कुटुंबातील लोकांनी मुलीचा शोध सुरू केला आणि तिला शोधून काढले आणि गुजरातमधून परत आणले. या दरम्यान नवरदेवाने १३ दिवस नवरीची वाट पाहिली. शेवटी नवरीच्या घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले आणि नवरदेव तिला आपल्या घरी घेऊन गेला.

हेही वाचा : Viral Video : भर लग्नात नवरदेवाच्या समोर नवरीने गुटखा खाल्ला अन्…

सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. विशेष करून नवरदेवाचे कौतुक केले जात आहे.