Wari 2025 Shocking Viral Video : आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यभरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातील वारकऱ्यांनी पंढरपूरची वाट धरली आहे. वारीच्या निमित्ताने संतांच्या पालख्याही पंढपूरच्या दिशेने प्रस्थान करतायत. त्यात पुणेकरांना निरोप घेऊन श्री संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी रविवारी सायंकाळी दिवेघाट चढून सासवडला मुक्कामी पोहोचली. याच मुक्कामी पालखीला बांधलेल्या बैल पिसाळल्याची घटना घडली. वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहून बैल बिथरला. त्यानंतर पुढे काय घडलं ते जाणून घेऊ…

संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दिवेघाट पार करून विसाव्यासाठी थांबला तेव्हा एक धक्कादायक घटना घडली. विसाव्याच्या ठिकाणी हजारो वारकऱ्यांच्या गर्दीत अचानक एक बैल उधळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वारकऱ्यांमध्येही गोंधळ निर्माण झाला. अचानक सगळ्यांनी धावाधाव सुरू केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर इजा झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दिवेघाटातील टप्पा पार करून संतांच्या पालख्या विसाव्यासाठी सासवडच्या वडकी नाला येथे थांबल्या होत्या. याच ठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जवळच्या गावाखेड्यातील हजारो लोक या पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी जमले होते. दरम्यान, वारकऱ्यांच्या गर्दीत पालखीच्या रथाला जुंपलेला एक बैल बिथरला. त्याने थेट शिंगांनी गर्दी पांगवली आणि तो प्रवेशद्वारातून बाहेर धावत सुटला. उधळलेल्या बैलाला पाहून उपस्थित लोकही दूर पळू लागले. बैलाने त्याच्या वाटेत येणाऱ्या लोकांनाही शिंगांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणाताही गंभीर दुखापत झाली नाही; पण वारकऱ्यांच्या पळापळीत रस्त्याच्या कडेला उभी केलेली अनेक वाहनं कोसळली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ akshat.pawar नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने पोस्ट केला आहे, ज्यावर लोक आता वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, त्याला सगळ्यांनी वारंवार हात लावून त्रास दिला असेल. दुसऱ्याने लिहिले की, बैलपण म्हणत असेल की, तुम्ही देवात देव ठेवला नाही. सगळा बाजार करून ठेवला म्हणून… एकमेकाला मारून मागे ढकलत पालखीला हात लागावा म्हणून झुंबड असते लोकांची… याने देव पावणार आहे का?