कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अशा फसव्या आघाडीशी संबंध ठेवायचे का याचा विचार करावा लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी ऊस परिषदेत दिला. आगामी हंगामात उसासाठी प्रतिटन ३३०० रुपये उचल देण्याची मागणी करतानाच शेतकऱ्यांना पावणे चारशे रुपये दर मिळवून देण्याचा निर्धार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद जयसिंगपूर येथे झाली. परिषदेत शेट्टी यांनी केंद्र व राज्य शासनावर जोरदार टीका केली. साखर कारखानदारांची प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रशासनाने बैठक बोलावली. नाममात्र आश्वासन देऊन कारखान्यांची बोळवण केली. नीती आयोगाच्या माध्यमातून एफआरपीचे तुकडे करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty warns mahavikas aghadi at sugarcane conference kolhapur srk
First published on: 19-10-2021 at 20:32 IST