= खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?

१) घटनेच्या कलम १२९ मध्ये असे नमूद केलेले आहे की सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखा न्यायालय आहे.
२) संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बठकीचे अध्यक्षपद राष्ट्रपती भूषवतात.
३) लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा झाल्यास तो उपराष्ट्रपतींकडे सादर करणे आवश्यक असते.
४) राज्यसभेतील प्रत्येक सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
स्पष्टीकरण : १) संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्तबठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात.
२) लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा झाल्यास उपसभापतींकडे सादर करणे आवश्यक असते.
३) राज्यसभेतील प्रत्येक सदस्यांचा कार्यकाळ सहा
वर्षांचा असतो.
= खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) लोकसभा निलंबित ठेवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.
२) संसदेने संमत केलेले विधेयक राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवले गेल्यास राष्ट्रपती ते पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात.
३) लोकसभेतील शून्य प्रहाराचा कालावधी एक तासाचा आहे.
४) सरदार वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख भारताचे पहिले उपपंतप्रधान असा करता येईल.
१) १ व २ बरोबर २) २ व ४ बरोबर
३) १, २ व ४ बरोबर ४) वरीलपकी सर्व
स्पष्टीकरण- लोकसभेतील शून्य प्रहाराचा कालावधी हा विहित केलेला नाही.
= खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) जेव्हा एखाद्या विधेयकासंदर्भात दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद असतात तेव्हा दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलावले जाऊ शकते. मात्र, अर्थविषयक विधेयक याला अपवाद आहे.
२) घटनादुरुस्ती विधेयकांवर नकाराधिकार वापरण्याचा राष्ट्रपतींचा विशेष अधिकार २४ वी घटनादुरुस्ती १९७१ अन्वये काढून घेण्यात आला आहे.
३) यशवंतराव चव्हाण हे वैधानिकरीत्या लोकसभेचे पहिले विरोधी पक्षनेते ठरले.
४) राष्ट्रपतींच्या वटहुकूमाला कायद्याइतकाच दर्जा असतो. अशा वटहुकूमास संसदचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर सहा आठवडे मुदतीच्या आत संसदेची सहमती मिळवावी लागते.
१) १ व २ बरोबर २) २ व ४ बरोबर
३) १, २ व ४ बरोबर ४) १, २, ३ व ४ बरोबर
= खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) अर्थविषयक विधेयक आणि एकूणच आíथक बाबतीत लोकसभेचा शब्द हा अंतिम असतो.
२) भारतीय संसदीय इतिहासातील अविश्वासाचा पहिला ठराव जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळाविरुद्ध मांडला गेला.
३) िनदाव्यंजक ठराव मंजूर होणे हा सरकारचा पराभव मानला जातो.
४) अर्थविषयक विधेयकावर चर्चा करण्याचा राज्यसभेला अधिकार आहे. मात्र, अर्थविषयक विधेयक फेटाळण्याचा अधिकार राज्यसभेस नाही.
१) १ व २ बरोबर २) २ व ४ बरोबर
३) १, २ व ४ बरोबर ४) १, २, ३ व ४ बरोबर
= खालीलपकी कोणते विधान योग्य आहे?
१) राज्यघटनेचा भंग केल्यासच राष्ट्रपतींना पदावरून दूर करता येते व त्यासाठी महाभियोगाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
२) उच्च न्यायालयाच्या अथवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांचे कर्तव्य बजावताना केलेल्या वर्तनाबद्दल संसदेत चर्चा होऊ शकते.
३) फक्त सरन्यायाधीशांच्या लेखी सल्ल्यानुसारच राष्ट्रपती कलम ३५२ अन्वये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात.
१) फक्त १ बरोबर २) १ व ३ बरोबर
३) २ व ३ बरोबर ४) १, २ व ३ बरोबर