नाशिक येथील आधारतीर्थ आश्रम शाळेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले ‘आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली. ती चुक तुम्ही करू नका’ अशा आशयाचा फलक घेऊन संत तुकाराम महाराजाच्या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत. ‘मुख्यमंत्रीसाहेब आमच्याकड़े लक्ष द्या’ अशी एकच हाक दिंडीतील मुलांकडून ऐकण्यास मिळाली.

नाशिक येथील आधारतीर्थ आश्रममध्ये राज्यातील विविध भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत. तेथील मुलांची दिंडी आळंदी ते पंढरपूर या दरम्यान असून या दिंडीचे यंदा पाचवे वर्ष आहे. यामध्ये वयोगट ५ ते १५ वर्षापर्यंतची ५० मुले सहभागी झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, आत्महत्या हा पर्याय नाही, असा संदेश असलेल्या टोप्या त्या विद्यार्थ्यांनी घातल्या होत्या. उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या.

Dudhganga tap water scheme,
इचलकरंजीची दूधगंगा नळपाणी योजना रखडल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राजू शेट्टी यांचे टीकास्त्र
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

farmers-dindi21_1

या वेळी अशोक मोतीराम पाटील म्हणाला की, माझ्या वडिलांनी मी ४ वर्षांचा असताना आत्महत्या केली. आजही राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारने आता कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी कायमस्वरूपी निर्णय घेण्याची गरज असून मुख्यमंत्रीसाहेब आमच्याकडे लक्ष द्या आणि शेतकऱ्ंयाचे राज्य येऊ द्या, अशी मागणी केली.