लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: मागील काही दिवसांपासून वसई-भाईंदर रो-रो सेवा सुरू झाली आहे. मात्र या सेवेमुळे खाडीत पारंपारिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.

Birds and wildlife near village face extinction gram panchayat is addressing poaching
परप्रांतीय मजुरांच्या शिकारीबद्दल, संबंधित शेतकऱ्यांवरही कारवाई, द्राक्ष बागायतदारांना इशारा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
rasta peth gutkha
पुणे: रास्ता पेठेत ११ लाखांचा गुटखा जप्त; अमली पदार्थ विरोधी विभागाकडून दोघांना अटक
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
villagers protested against daighar garbage project
ठाण्यात पुन्हा कचराकोंडीची चिन्हे; डायघर प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध, देयके मिळत नसल्याने ठेकेदाराने रोखल्या घंटागाड्या
Thane police, Thane traffic, Thane police injured,
ठाणे : वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांचाच जीव धोक्यात, सुमारे महिन्याभरात पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
CIDCO will cut down 30000 tress in belapur
सागरी किनारा रस्त्यासाठी हजारो झाडांचा बळी? बेलापूरमध्ये मानवी साखळी आंदोलन करत नागरिकांचा तीव्र विरोध
Loksatta chip charitra Fables revolution chip Semiconductor chip manufacturing Morris Chang TSMC
चिप चरित्र: ‘फॅबलेस’ क्रांतीची नांदी

वसई, नायगाव, कोळीवाडा या भागातील मच्छीमार वसई खाडी तसेच जास्त करुन भाईंदर खाडीत पारंपारिक पद्धतीने आणि त्यावर डोल, जाळे बांधून मागील ६० ते ७० वर्षांपासून मासेमारी करत आहेत.

आणखी वाचा- नालासोपाऱ्यातील बनावट चकमक प्रकरण, दोन पोलिसांना हत्येच्या गुन्ह्यात अटक

सदर जागेचा खुंटवाच्या रुपाने सरकारला कर भरणा केला जात आहे. परंतु मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई भाईंदर अशी रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्या भागात मच्छीमारांची मासेमारी करण्याची जागा होती त्याच भागातून या रो-रोची वाहतूक सुरू असते. याचा परिणाम पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीवर होऊन नुकसान होऊ लागले आहे, असे नायगाव कोळीवाडा येथील मच्छीमारांनी सांगितले

उपाययोजना करण्याची मागणी

आधीच मत्स्य दुष्काळ व इतर समस्या यामुळे अडचणी आल्या आहेत. त्यातच आता रोरो वाहतूक यामुळे मासेमारी करण्याची जागा बाधित झाल्याने व्यवसाय ठप्प होईल यासाठी यावर योग्य त्या उपाययोजना करून मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळ व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार ही करण्यात आल्याचे मच्छीमारांनी सांगितले आहे.