वसई: वसई विरार  व मीरा भाईंदर शहरातपरदेशातील नागरिक राहण्यासाठी येऊ लागले आहेत. परंतु शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये बहुतांश अशा नागरिकांचा सहभाग आढळून येत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयाने परदेशातून येणाऱ्या नागरिकांना भाडेतत्वावर घर देताना त्यांची माहिती पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचा मनाई आदेश पोलिसांनी जारी केला आहे.

वसई विरार व मीराभाईंदर शहराचे झपाट्याने नागरीकरण वाढू लागले आहे. तर या शहरातील परिसरात स्वस्तात व भाडेतत्वावर घरे उपलब्ध होत असल्याने परदेशातील विविध ठिकाणच्या भागातून येऊन वास्तव्य करीत आहेत. परंतु याची कोणतीच अधिकृत माहिती पोलीस ठाण्याला नाही. त्यातच यातील काही नागरिक गुन्हेगारी, अंमली पदार्थ तस्करी  व विविध प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग आढळून येत आहे.

Birds and wildlife near village face extinction gram panchayat is addressing poaching
परप्रांतीय मजुरांच्या शिकारीबद्दल, संबंधित शेतकऱ्यांवरही कारवाई, द्राक्ष बागायतदारांना इशारा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Queues of citizens, Dombivli Civic Facility Center,
कर्मचाऱ्यांअभावी डोंबिवली नागरी सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांच्या रांगा
flood situation alarming in north bengal centre not extending help says cm mamata banerjee
प. बंगालमधील पूरस्थिती चिंताजनक; केंद्र सरकार मदत करत नसल्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप
Skills training for youth, Skills training youth Maharashtra, Skills training for Israel,
युद्धग्रस्त इस्रायलसाठी राज्यातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण ! कुशल कामगारांचा तुटवडा असल्याचे कारण
senior officials of railways to provide more than 60 rakes twice for onion transport
नाशिक : कांदा देशभरात पाठविण्यासाठी यंदा दुप्पट रेक, व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वेची तयारी
Vegetables expensive pune, pitru pandharwada,
पितृपंधरवड्यात भाज्या महाग
Ambernath Chemical Gas Leakage
अंबरनाथ शहरात पुन्हा वायू गळती; गुरुवारी रात्री मोरिवली, बी केबिन भागात नागरिकांना त्रास

हेही वाचा >>>वसई : गोदामाची भिंत कोसळून दुर्घटना: ठेकेदाराला अटक, अनधिकृत बांधकामे रोखण्यास पालिका अपयशी

यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी वसई- विरार मीरा भाईंदर शहरात १ मार्च पासून २८ एप्रिल पर्यँत  फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ (१)(२) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. याआधी घरमालक पैशाच्या लालसेपोटी परदेशी नागरिकांची कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता त्याला भाडेतत्वावर घर देत होता. मात्र आता असे करता येणार नाही. मालकाला परदेशीनागरिकांना घर, दुकाने हॉटेल व जमीन भाड्याने देण्यापूर्वी त्यांची रीतसर भाडे करार करून २४ तासाच्या आत नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती दिल्याशिवाय भाड्याने देवू नये असे आदेश पोलिसांनी दिले आहेत. जे नियमांचे पालन करणार नाहीत अशावर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.