विरार : विरारमध्ये काल गुरुवारी अचानक प्रवासी आणि रिक्षाचालकांत रिक्षा भाडय़ावरून वाद सुरू झाला. प्रहार संघटनेने रिक्षा प्रवासी भाडय़ाचे दर असलेले पत्रक रेल्वे स्थानक परिसरात वाटण्यास सुरुवात केल्यानंतर या वादाला तोंड फुटले. रिक्षाचालकांनी तीन तास रिक्षा बंद ठेवल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरारमध्ये करोनाकाळापासून रिक्षाचालकांनी भाडे वाढ केली आहे. करोनाकाळात रिक्षाचालकांनी दुपटीने भाडे वाढविल्याने प्रवासी संघटनांनी अनेक वेळा विरोध केला होता. पण रिक्षाचालकांनी भाडेवाढ कायम ठेवत प्रवाशांची लूट चालवली होती. त्यातच वसई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा संघटनांच्या मागणीवरून परिवहन महामंडळाकडून रिक्षाचे दरपत्रक अंतिम ठरवून घेतले आणि त्यानुसार रिक्षाभाडे आकारण्याचे आदेश दिले. मात्र रिक्षाचालकांनी त्याकडेही लक्ष दिले नाही. बेकायदा भाडेवाढ सुरूच ठेवली. पुन्हा प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आणि भाडेवाढ कमी करण्याची मागणी करू लागल्या.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers auto driver clash in virar over rickshaw fare zws
First published on: 20-08-2022 at 00:47 IST