लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : मागील चार ते पाच दिवसापासून सुरू झालेली रोरो सेवा शनिवारी दुपारी वसईच्या जेट्टी जवळ धडकली व त्यानंतर जागीच अडकून पडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान मंगळवार पासून प्रायोगिक तत्त्वावर रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे. सेवा सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत. सकाळी पावणे सात ते सायंकाळी साडे सात या दरम्यान ही सेवा दिली जाते.

roads, NAINA, Re-tendering, tender,
‘नैना’तील रस्त्यांसाठी पुन्हा निविदा, तीन हजार ४७६ कोटींच्या निविदा जाहीर, पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने रस्ते बांधणीची कामे
beaches, machines, Raigad, beach,
समुद्र किनाऱ्यांची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता होणार, चार अत्याधुनिक मशिन्स रायगडमध्ये दाखल
injured bull
माथेफिरुने केलेला कुऱ्हाडीचा घाव पाठीत वर्मी बसला, गावभर फिरस्ती अन् माणुसकी मदतीला धावली
Citizens of Dombivli West travel on gravel roads Neglect of MMRDA Public Works Department
डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांचा खडीच्या रस्त्यांवरून प्रवास; एमएमआरडीए, सार्वजनिक बांंधकाम विभागाचे दुर्लक्ष
15 ips officers transferred from maharashtra
राज्यातील १५ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
thane township residents unite to close rmc project in ghodbunder area
घोडबंदरचा ‘आरएमसी’ प्रकल्प बंद करण्यासाठी रहिवाशांची एकजूट; आंदोलनात पर्यावरणवादी सहभागी
Yeoor, noise, environmentalists,
ठाणे : येऊरमध्ये क्रिकेटप्रेमींचा धिंगाणा; गोंगाटाविरोधात आदिवासी, पर्यावरणवाद्यांचे आंदोलन
Slum Rehabilitation in Mumbai and Mumbai Metropolitan Region
प्राधिकरणांना ‘झोपु’चे लक्ष्य!दोन लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश

शनिवारी नेहमी प्रमाणे या फेरीबोटीची सेवा सुरू होती. मात्र दुपारच्या सुमारास वसईच्या जेट्टीवर ही बोट लावत असताना अचानकपणे ही बोट जेट्टीला धडकली व त्याचा मोठा हादरा त्यात असलेल्या प्रवाशांना बसला.

आणखी वाचा-मराठा आरक्षणासाठी लग्नाचा मुहूर्त बाजूला ठेवून वऱ्हाडींसह रास्ता रोको आंदोलनात उतरले नवरा-नवरी

त्यातच समुद्राला आहोटी आली असल्याने ती बोट जागीच अडकून राहिली. जवळपास दोन ते तीन तासापासून बोटीला काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. समोरून दुसऱ्या बोटींना दोर बांधून बोट खेचून पुढे नेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी दोन वेळा दोर तुटला असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. या घडलेल्या घटनेमुळे काही काळ प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.