राजेंद्र भट हे गेली ३३ वर्षे बदलापुरच्या बेंडशिळ येथे सेंद्रिय शेती करत आहेत. भटवाडी येथील आपल्या ‘निसर्गमित्र’ फार्ममध्ये त्यांनी ५ एकर जमिनीवर शेती फुलवली आहे. त्यात १८७ प्रकारच्या वनस्पतींचा समावेश आहे. याच लागवडीतून त्यांनी शेतात जैवविविधता तयार केली आहे. परिसंस्था आणि शेती यांच्यातील ताळमेळ कसा साधता येईल? या अनुषंगाने राजेंद्र भट यांचं काम सुरू आहे.