‘गेल्या दोनेक वर्षांतच हे गोरक्षक मोठ्या संख्येने कसे काय निर्माण झाले?’ असा जळजळीत सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने विचारला आहे. गेल्या काही महिन्यांपासून गोहत्येच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांकडून दलित आणि मुसलमानांवर जे हल्ले होत त्यावर अखेर पंतप्रधानांनी मौन सोडले. पंतप्रधांनी जरी या तथाकथित गोरक्षकांवर सडकून टीका केली असली, तरी काँग्रेस राजवटीत काहीच सर्वोदयवादी कार्यकर्ते […]