भारतीय लष्कराच्या तळांवर नुकताच दहशतवादी हल्ला झाला होता. भारतीय जवानांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सूचनेवरून राजस्थान संस्कृत अॅकेडमीच्या वतीने ‘राष्ट्र रक्षा यज्ञ’चे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थानमधील भारत-पाक सीमेवरील श्री मातेश्वरी तनोट राय मंदिरात २१ ‘देशभक्त ब्राह्मणांद्वारे’ हा महायज्ञ करण्यात येणार आहे. या महायज्ञात मुख्यमंत्री वसुंधरा राजेही सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हेही महायज्ञासाठी हजेरी लावण्याची शक्यता आहे.