ए दिल है मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वादावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यात मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून काढलेला तोडगा ही भयंकर मोठी चूक असल्याची प्रतिक्रिया अभिनेता फरहान अख्तर याने व्यक्त केली आहे. हा प्रकार अत्यंत दुर्देवी असून त्यामुळे चुकीचा पायंडा पाडला गेला आहे, असे फरहान अख्तरने सांगितले.