सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येते आहे. याला भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देत असून, आतापर्यंत १५ पाकिस्तानी रेंजर्सना कारवाईत ठार मारण्यात आले असल्याचे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले