उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेचा निषेध सर्वच स्तरातून केला जात आहे. या घटनेबद्दल बोलायला शब्द नाहीत. कोणत्याही राज्यात अशा प्रकाराच्या घटना घडता कामा नये. अशा घटना घडू नयेत म्हणून कडक कायदे आणि नियम झाले पाहिजेत. याकरिता केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे