“निकाल एका शब्दात सांगतो न्यायालयाने हे सरकार डिसमिस केलं. जेलमध्ये गेलेला माणूस बाहेर येताना बॅरिस्टर होऊन येतो. न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे फाशी, मात्र ती द्यायला जल्लाद लागतो. ते काम विधानसभा अध्यक्षांना दिलंय. त्यांनी त्यांचं काम केलं तर आम्ही त्यांचा जाहीर नागरी सत्कार करू, त्यांना आपलं काम करावेच लागेल. आमदारांना अपात्र घोषित करावे लागेल, असा मला आत्मविश्वास आहे” असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना मेळाव्यात केले.