Supriya Sule: “आमचे विरोधक इतके घाबरले की…”; सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला टोला
बीडच्या अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना नारायण दादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान सुप्रिया सुळे यांनी भारत आणि इंडियाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष केलं आहे. आम्ही इंडिया नाव ठेवलं म्हणून विरोधक घाबरले. इंडियाचं नाव आता भारत करण्याचा विचार आहे. त्यासाठी १४ हजार कोटी रुपयांचा खर्च होईल, असा दावा करत सुप्रिया सुळेंनी केंद्रावर निशाणा साधला.