राहुल नार्वेकरांनी शिवसेनेबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जो निर्णय दिला तो चुकीचा आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना हे पक्षनाव तसंच धनुष्यबाण हे चिन्ह परत मिळेल असा दावा असीम सरोदे यांनी केला आहे. तसंच मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यांत धूळफेक केली गेली आहे असंही असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.