महायुतीत जागावाटापासंदर्भात शुक्रवारी (८ मार्च) दिल्लीत अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीतून जागावाटपाचा तिढा सुटल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. “स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. अजित पवारांनीही अशीच भूमिका घेतली. पण आता त्यांना लोकसभेच्या दोन-चार जागांसाठी दिल्लीत जाऊन व्यापाऱ्यांची भांडी घासावी लागत आहेत. डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली आहे.