शिवसेनेने (ठाकरे गट) आपल्या १७ उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी असल्याचं चित्र आहे. सांगली तसंच मुंबईतील काही जागांवरून काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेला युती धर्माची आठवण करून दिली. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत अमरावती आणि रामटेकच्या जागेचा उल्लेख केला. काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे एका सांगलीसाठी काँग्रेस पंतप्रधानपद घालवणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.