मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (९ एप्रिल) गुढी पाडवा मेळाव्याच्या सभेत पंतप्रधान मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे आता राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. याबाबात खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असं अचानक काय घडलं की महाराष्ट्राच्या शत्रुंना पाठिंबा द्यावा लागला? तुमचा पक्ष नमो निर्माण का झाला? असे सवालही राऊत यांनी यावेळी उपस्थित केले.