आधी मुलाला मग साहेबांना आणि लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं होतं. त्यासंदर्भात आज (११ एप्रिल) शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी यात चुकीच काय आहे? असं म्हटलं. पुढे ते म्हणाले की मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार असं वक्तव्य करताच कार्यकर्त्यांनाही हसू अनावर झालं.