युत्या, आघाड्यांचे सरकार आता कालबाह्य झाले असून, महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपला सत्तेत बसवण्याची आवाहन करत, ज्यांच्या घड्याळाचे काटे पक्षस्थापनेपासून थोडेही पुढे सरकत नाही ते काय राज्याचा विकास करणार असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी आर.आर पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या तासगावमधील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमापोटी शिवसेनेवर टीका करत नसल्याचा उल्लेख  मोदी यांनी यावेळी भाषणात केला.  फलोत्पादक शेतक-यांना अनेक आश्वासने यावेळी मोदी यांनी दिली.