महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती तुटली असली आणि विधानसभा पोटनिवडणुकीत मोदी लाटेला फटका बसला असला तरी त्याचा अर्थ भाजपला उतरती कळा लागली आहे असा होत नाही, असे लोकजनशक्ती पक्षाने म्हटले आहे. महाराष्ट्र आणि हरयाणात अडचणीची स्थिती असली तरी एनडीए अबाधित आहे, असे लोकजनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले आहे.