शिक्षणाबरोबरच मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा विचार जिथे चíचलाही जात नव्हता त्या काळी मुंबई उपनगरात अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल या शाळेने १५ ऑगस्ट १९५५ रोजी प्रत्येक वर्गाने एक प्रकल्प आपल्या वर्गात उभारायचा, अशी कल्पना मांडली आणि गेली ६२ वष्रे प्रत्येक १५ ऑगस्ट रोजी हा उपक्रम तितक्याच जोमाने, उत्साहाने राबविला जातो. अशा या शाळेला ७५ वष्रे पूर्ण होत आहेत. तरीही नव्या आव्हानांना अनुसरून शाळेतील प्रत्येक विद्यार्थी बहुश्रुत आणि चांगला नागरिक कसा घडेल या दृष्टीने पंचाहत्तरीच्या या जीवनशाळेची वाटचाल सुरू आहे.

तेव्हाच्या म्हणजे १९४२ च्या काळात आडगाव असलेल्या गोरेगावमध्ये केवळ सात विद्यार्थ्यांना घेऊन अंबाबाई मंदिराच्या समोरील ओसरीवर शाळा सुरू झाली. त्या वेळची गोरेगावची वस्ती केवळ पश्चिमेला होती. सामंत, म्हात्रे, चुरी, तेंडुलकर अशी चार-पाच घरे सोडल्यास पूर्वेला फक्त आरे कॉलनी आणि जंगल होते. लोकल बोर्डाची शाळा चौथीपर्यंतच. तेव्हा काही जाणत्या मंडळींनी एकत्र येऊन स्थानिक मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून पातकर मास्तरांच्या मदतीने शाळेचा पाया रचला. सुरुवातीला पाचवी ते सातवीपर्यंतच असलेल्या शाळेत आता पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे.

दयानंद प्रभू हे जवळपास ३० वष्रे शाळेला मुख्याध्यापक म्हणून लाभले. कडक शिस्त, वक्तशीरपणा, स्वच्छता, टापटीपपणा, शिक्षकांच्या व मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याची वृत्ती, शिक्षकांमधील एकोपा यामुळे शाळेत मोकळे वातावरण असे. शालान्त परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येणे किंवा गुणांसाठी आटापिटा करणे यापेक्षा शाळेचा मुख्य भर मुलांना विषय नीट समजण्याकडे, ज्ञानार्जनाकडे आणि त्याचा दैनंदिन जीवनात वापर करणे, भवताली आणि जगातही घडणाऱ्या घटनांची मुलांना माहिती करून देणे, चौकसपणाला उत्तेजन देणे, जबाबदारीची जाणीव निर्माण करणे अशा सर्व बाबींकडे लक्ष देऊन चांगला, बहुश्रुत माणूस, नागरिक कसा घडेल याकडे शाळेचे लक्ष आहे. गुणवत्तेप्रमाणे मुलांची विभागणी शाळेत कधीच झाली नाही. हेवा वाटेल असे विस्तीर्ण मदान शाळेला लाभले आहे. त्यामुळे आपोआपच विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना शाळेत वाव मिळतो.

जीवनाची प्रयोगशाळा

सुसज्ज प्रयोगशाळेबरोबरच प्रभू सर विद्यार्थ्यांना शेतात रात्री आकाशदर्शनाला नेऊन जीवनाच्या प्रयोगशाळेतही फेरफटका मारून आणत. ही परंपरा आजही कायम आहे. क्रमिक पुस्तकांमध्ये अभ्यासले जाणारे जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगोल हे विषय शाळेत टेलिस्कोप, अर्धवर्तुळाकारात तारांगणाची चित्रे, कदंब, बकुळ, तामण, करंज, पुत्रंजीव, नीलगिरी अशी वृक्षसंपदा जोपासून, औषधी वनस्पती फुलवून शाळेच्या आवारातच जिवंत केले आहेत.

येथे शिक्षकही घडतात

विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचे ज्ञानही अद्ययावत व्हावे यासाठी शाळा प्रयत्न करते. शिक्षकांना ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून इंग्रजीचे धडे देणे, शैक्षणिक सहली, भेटींचे आयोजन, महाविद्यालयीन प्राध्यापकांचे विषयवार मार्गदर्शन वर्ग, आजूबाजूच्या महाविद्यालयांच्या सहकार्याने वेगवेगळी प्रदर्शने भरविणे, गणितासाठी उन्हाळी शिबिरे शाळा आयोजित करते.

गुणवत्तेचा स्तर उंचावण्यासाठी

दुसरे आव्हान म्हणजे मराठीच्या बरोबरीने उत्तम दर्जाचे इंग्रजी शिकवायचे तर शिक्षकांचेही इंग्रजीचे ज्ञान उच्च दर्जाचे असायला हवे. सुजय फाऊंडेशनच्या मदतीने तेही प्रयत्न सुरू आहेत. नवनिर्मिती लìनग फाऊंडेशनच्या मदतीने इतर सात शाळांबरोबर गणितावरही काम सुरू आहे. केवळ घोकंपट्टी करण्यापेक्षा मुलांनी विषय समजून घेऊन शिकावे यावर सातत्याने भर दिला जातो. शाळेत पूर्ण वेळ समुपदेशक आहे. प्रशस्त कलादालन, उत्तम ग्रंथालय हे शाळेचे आणखी एक वैशिष्टय़.

६२ वर्षांचा उपक्रम – वर्ग प्रकल्प

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी १९५५ साली शाळेत सुरू झालेला वर्ग प्रकल्पाचा उपक्रम गेली ६२ वष्रे अखंडपणे सुरू आहे. यात वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनीच विषय निवडायचा, माहिती गोळा करायाची, सुरेख चित्रे काढायची, वळणदार अक्षरात तक्ते बनवायचे, गरजेनुसार मातीची घरे, माणसे बनवायची हे मुले एकमेकांच्या मदतीने करतात. उत्कृष्ट प्रकल्पाला बक्षीस. आता या प्रकल्पांचे सादरीकरणही विद्यार्थी इंग्रजीतून करू लागले आहेत. या प्रकल्पाचे विषयही ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक असे वैविध्यपूर्ण असतात.

मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता आधी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत याची पुरेपूर जाणीव शाळेला आहे. शिकविण्याच्या पद्धतीत बदल, वाचकचर्चा, अवांतर वाचन या उपक्रमांनी शाळेतील वातावरण बदलले. नवीन शिकवायचे तर आपणही नवीन गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे, आपले ज्ञान अद्ययावत केले पाहिजे हे शिक्षकांना पटले. शाळेत येणारी मुले आíथक व सामाजिक निम्न व निम्नतर स्तरातील आहेत. काहींची मातृभाषाही मराठी नाही. शिक्षण हक्क कायदा आला; परंतु पूर्णपणे अमलात आणण्यासाठी अशा मुलांना शिकविण्यासाठीचे मोडय़ुल उपलब्ध नाही; परंतु ही मुले शिकली तर समाज शिकेल याची जाणीव शाळेला आहे. त्याच दृष्टीने शाळेची वाटचाल पंचाहत्तरीनंतरही सुरू राहणार आहे.

संकलन – रेश्मा शिवडेकर

 reshma.murkar@expressindia.com