ज्या राज्याची निर्मितीच मुळी मराठी भाषिकांच्या अस्तित्वासाठीच्या रोमहर्षक लढय़ातून झाली, ज्या राज्यात गेल्या अर्धदशकाहून अधिक काळ मराठी भाषेच्या उत्कर्षांचा विचार राजकीय सभा-समारंभांतून उठताबसता मांडला गेला, त्याच आपल्या महाराष्ट्रात आज मराठी भाषा टिकायला हवी, मराठी माध्यमाच्या शाळा जगायला हव्यात अशा मुद्दय़ांवरून संमेलने आयोजित करण्याची वेळ आली आहे. ही संमेलने म्हणजे सरळ सरळ धोक्याची घंटा आहे. तर दुसरीकडे, ही संकटाला संधीत रूपांतरित करण्याची संधी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे खरे आहे की, मराठी माध्यमाच्या शाळांपुढे आज ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या काही एका दिवसातल्या नाहीत. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या काळापासूनच शिक्षणाचे माध्यम कोणते असावे, हा वाद आपल्याकडे सुरू आहे, आणि आजही त्या वादावरचे सकारात्मक ठाम उत्तर एक समाज म्हणून आपण देऊ  शकलेलो नाही. पण कृतीतून आपण सर्वानी जे उत्तर दिलेय ते निश्चितच मराठीच्या विरोधी आहे. एका अर्थाने, तुम्ही-आम्ही-आपण सगळेच मराठीच्या आजच्या स्थितीसाठी जबाबदार आहोत. त्यात जसे राज्यकर्ते, धोरणकर्ते येतात तसे सर्वसामान्य पालकही येतात. शिक्षक येतात, तसे शाळांचे विश्वस्तही येतात. पण आता एकमेकांना दोष देऊन काहीच साध्य होणार नाही. प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारायलाच हवी.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economic empowerment of marathi medium schools
First published on: 24-12-2017 at 04:20 IST