भारताने जरी आंतरराष्ट्रीय निर्वासितविषयक  करारावर स्वाक्षरी केली नसली तरी निर्वासितांना परत पाठवण्याबाबत भारत नेहमीच उच्च नैतिक भूमिका घेत आला आहे. जो देश त्याच्या उच्च आणि श्रीमंत नागरिकांसाठी अन्य देशांची दारे उघडली जावीत अशी अपेक्षा करतो, त्याने दाराशी आलेल्या निराधारांना आश्रय नाकारावा ही अस्वस्थ करणारी बाब आहे. मानवतावादी दृष्टिकोनातूनही भारताची भूमिका अपुरी (तुटपुंजी) आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्यानमारच्या रखीन प्रांतातून निर्वासित झालेल्या रोहिंग्यांना आश्रय देण्याबद्दलचा भारत सरकारचा पवित्रा हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अविचारी ठरणारा, इतिहासाच्या दृष्टिकोनातून अगदीच अदूरदृष्टीचा आणि नैतिकदृष्टय़ा असमर्थनीय असा आहे. सरकारने (सर्वोच्च न्यायालयात) केलेले कायदेशीर वक्तव्य आणि अन्यत्र केलेली राजकीय विधाने यांतून असेच दिसून येते की, रोहिंग्यांचे भारतात येणे कायदेशीर नसून बेकायदा आहे, म्हणजेच ते निर्वासित नसून घुसखोर आहेत, अशीच भारत सरकारची भूमिका व्यवहारात आहे. रोहिंग्य हे या सरकारला ‘सुरक्षेपुढील धोका’ वाटतात आणि  त्यांना आपल्या देशातून हाकलण्याच्या/ त्यांची परत पाठवणी करण्याच्या वल्गना होत आहेत. या दाव्यांमागचा पाया डळमळीत आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India stand on rohingya muslim
First published on: 24-09-2017 at 00:31 IST