ज्येष्ठ साहित्यिक कवी नामदेव ढसाळ यांच्या निधनाने मराठी दलित साहित्यातील एका सिद्धहस्त लेखकास महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दांत राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
शोकसंदेशात विखे यांनी म्हटले आहे, की मराठी दलित साहित्यात परिवर्तन घडविणारा लेखक आणि क्रांतिकारी कवी अशीच ओळख नामदेव ढसाळांची होती. ऐन तारुण्यात दलित पँथरसारख्या संघटनेतून दलितांचे आणि शोषितांचे प्रश्न मांडून अन्यायाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने आपल्या लेखणीतूनही क्रांतिकारी विचार समाजापुढे मांडला. मराठीला समृद्ध करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी नामदेव ढसाळ यांचे नाव मराठी साहित्यात अजरामर राहील. त्यांच्या जाण्याने बोलीभाषेत लेखन करणारा दलित साहित्यिक गेल्याचे मोठे दु:ख आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2014 रोजी प्रकाशित
कृषिमंत्र्यांची ढसाळ यांना श्रद्धांजली
ज्येष्ठ साहित्यिक कवी नामदेव ढसाळ यांच्या निधनाने मराठी दलित साहित्यातील एका सिद्धहस्त लेखकास महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दांत राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

First published on: 16-01-2014 at 03:11 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture minister homage to namdev dhasal