चिपळूण येथे जानेवारीमध्ये होणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयातर्फे पाच लाख रुपयांची देणगी गुरुवारी देण्यात आली. कुलगुरु डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी देणगीचा धनादेश स्वीकारला. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.
डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले,‘‘साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे वैभव आहे. राज्याची सांस्कृतिक समृद्धी वाढविण्याचे काम संमेलनाने केले आहे. त्यामुळे अशा संमेलनांना मदत करताना आनंद वाटतो. कोकणच्या भूमीत होत असलेल्या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करेल.’’
प्रकाश देशपांडे म्हणाले,‘‘भारती विद्यापीठासारख्या प्रगतशील विचारांच्या संस्थेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने केलेली मदत मोलाची आहे. कोकणच्या मातीत २२ वर्षांनी होणारे हे संमेलन वैशिष्टय़पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
भारती विद्यापीठातर्फे साहित्य संमेलनास पाच लाखाची देणगी
चिपळूण येथे जानेवारीमध्ये होणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयातर्फे पाच लाख रुपयांची देणगी गुरुवारी देण्यात आली. कुलगुरु डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी देणगीचा धनादेश स्वीकारला.
First published on: 23-11-2012 at 02:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharti univercity gives five lakhs donation to edotorial annual meet