गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात पाणी जात असताना तालुक्यातील हिंगणी बंधाऱ्यात फळ्या टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या जवळपास ९० शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जायकवाडी धरणासाठी गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले. दरम्यान, दि. ३० पासून नदीला पाणी वाहत असतानाही ते पाणी उचलता येत नसल्याने पाण्याअभावी नदीकाठची पिके जळू लागली, म्हणून त्रासलेल्या मुर्शतपूर येथील काही शेतकऱ्यांनी शुक्रवारी हिंगणी बंधाऱ्यावर फळ्या टाकण्याचा प्रयत्न केला.
शेतकरी हिंगणी बंधाऱ्यावर फळ्या टाकत आहेत ही गोष्ट पोलिसांना कळाल्याने महसूल व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. टाकलेल्या फळ्या काढून घेऊन अप्पासाहेब गोर्डे, अप्पासाहेब बोराडे, हरीभाऊ केशव शिंदे, संदीप गरुळे, भाऊसाहेब शिंदे, संदीप शिंदे आदी ९० च्या वर शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे