गेल्या पंधरा दिवसापूर्वी शेतकरी संघटनेच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आणाजे (ता. राधानगरी) येथील शेतकरी ग्रामस्थांनी पाच हजाराचा निधी गोळा करून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जालंदर पाटील यांच्याकडे देण्यात आला.
या वेळी जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले,की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उसाची पहिली उचल ३००० रुपये मिळावी यासाठी संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलने केली. या आंदोलनावेळी गरीब शेतकऱ्यांना पोलिसांनी मारहाण आणि गोळीबार केला. या घटनेमध्ये दोन शेतकरी मयत झाले. त्याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी पाटील यांनी केली. तसेच गोळीबाराच्या घटनेचा ही घटनेचा निषेध करण्यात आला.
गोळीबाराच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे भरीव मदत मिळावी अशी मागणी केली.या वेळी बाळासो भांदिगरे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गोजारे, शिवाजी पाटील, डी. जी. टेपुगडे, दत्तात्रय तिबीले, साताप्पा पाटील, लक्ष्मण तिबिले, अण्णा जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज भांदिगरे तर उपस्थिांचे आभार गणेश पाटील यांनी मानले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत
गेल्या पंधरा दिवसापूर्वी शेतकरी संघटनेच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आणाजे (ता. राधानगरी) येथील शेतकरी ग्रामस्थांनी पाच हजाराचा निधी गोळा करून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जालंदर पाटील यांच्याकडे देण्यात आला.
First published on: 23-11-2012 at 02:46 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Died in fire farmers family gets help