भारतीय डाक विभागाच्या वतीने शालेय मुलांसाठी घेण्यात येणारी चित्रकला स्पर्धा यंदा २५ नोव्हेंबरला (रविवार) श्रीरामपूर येथील मुख्य टपाल कार्यालयात होणार आहे. स्पर्धेचा विषय सुट्टी असा असून वेळ २ तासांचा आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी टपाल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डाक विभागाच्या वतीने दरवर्षी बालदिनानिमित्त अशी स्पर्धा घेण्यात येत असते. स्पर्धेतील बक्षिसपात्र चित्रांना रोख रकमेची बक्षिसे देण्यात येतात. इयत्ता ४ थी पर्यंत, इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंत, इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत अशा तीन गटांत स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटात पहिल्या तीन क्रमाकांसाठी अनुक्रमे १० हजार, ६ हजार व ४ हजार रूपये असे बक्षिस आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीरामपूर डाक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.