राज्य सरकारच्या विमुक्त भटक्या जमातीतील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत लातूर तालुक्यातील सिकंदरपूर येथे ४५ घरे साकारणार असून, राज्यात सर्वप्रथम या योजनेचा मान लातूरला मिळाला.
सिकंदरपूर येथे सुमारे ३५ वर्षांपूर्वी कामाच्या शोधात आलेली ४५ भटके कुटुंबे सुमारे १ एकर जागेत पाली घालून राहात होते. तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत या लोकांना पक्की घरे मिळावीत, यासाठी सरपंच माधव गंभीरे, तसेच जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संतोष देशमुख यांनीही पाठपुरावा केला होता. समाजकल्याण विभागाकडे लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी ग्रामस्थांच्या अडचणी मांडल्या. त्यातून पक्क्या घरांसाठी तब्बल १ कोटी ७७ लाखांचा निधी मंजूर झाला. २७५ नागरिकांची वस्ती असलेल्या व गवताच्या पालीमध्ये राहणाऱ्या ४५ कुटुंबांना प्रत्येकी २६९ चौरस फुटाची पक्की घरे बांधून मिळणार आहेत. सोबत सेफ्टी टँक, गटारी, पाणी, अंतर्गत रस्ते, अंगणवाडी, शाळा व सभागृहही या योजनेंतर्गत मंजूर केले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे तांडय़ावरील लोकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी