वसई झेंडाबाजार येथील रशीद युसूफ शेख या टांगेवाल्याचा एक घोडा विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू पावला. तातडीची मदत म्हणून टांगेवाल्याला २००० रुपये दिल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी २५,००० रुपयांची भरपाईची रक्कम देण्याचे आदेश विद्युत निरीक्षक जी. बी. राजुलू यांच्या अहवालानंतर देण्यात आले आहेत.
२६ एप्रिल २००९ रोजी शेख यांचा घोडा शॉक लागून मृत्यू पावला. शेख यांनी नुकसानभरपाईची मागणी महावितरणकडे केली. तातडीची मदत म्हणून दोन हजार रुपये रोख यांना देण्यात आले. नंतर वारंवार शेख यांनी पाठपुरावा केला. नंतर शेख व वसई काँग्रेसचे शहराध्यक्ष मायकल फुटर्य़ाडो यांनी महावितरणाच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेतल्याने मृत घोडय़ाच्या मालकाला २५ हजार रुपये भरपाईचे आदेश देण्यात आले.