मागील ऊस बिलातील संचित तोटय़ाला वर्ग केलेले १५२ रु पये त्वरित शेतकऱ्यांना परत करावे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी कायम असून, याबाबत भोगावती साखर कारखान्याने सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा केली आहे.
कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल २५०० रु पये देण्याचे जाहीर करण्याबाबत संघटनेच्या कार्यकर्याना बोलावून बैठक घेतली होती. यावेळी मागील वर्षांचे अंतिम बिल किती यावर संघटनेने खुलासा मागितला.
गतवर्षीचे अंतिम बिल आम्ही घेणारच यामध्ये १५२ रु पये परत करा. याबाबत कारखान्याने सर्वपक्षीय बैठक घेऊन खुलासा करावा यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू, असे संघटनेने स्पष्ट केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आण्णाप्पा चौगले, पांडुरंग सुतार, रावसाहेब डोंगळे, भरत आमते, बाबुराव कोथळकर, आनंदा पाटील (ठिकपुर्ली), विलास पाटील, तानाजी मगदूम, शंकर जाधव आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.