मागील ऊस बिलातील संचित तोटय़ाला वर्ग केलेले १५२ रु पये त्वरित शेतकऱ्यांना परत करावे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी कायम असून, याबाबत भोगावती साखर कारखान्याने सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा केली आहे.
कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल २५०० रु पये देण्याचे जाहीर करण्याबाबत संघटनेच्या कार्यकर्याना बोलावून बैठक घेतली होती. यावेळी मागील वर्षांचे अंतिम बिल किती यावर संघटनेने खुलासा मागितला.
गतवर्षीचे अंतिम बिल आम्ही घेणारच यामध्ये १५२ रु पये परत करा. याबाबत कारखान्याने सर्वपक्षीय बैठक घेऊन खुलासा करावा यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू, असे संघटनेने स्पष्ट केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आण्णाप्पा चौगले, पांडुरंग सुतार, रावसाहेब डोंगळे, भरत आमते, बाबुराव कोथळकर, आनंदा पाटील (ठिकपुर्ली), विलास पाटील, तानाजी मगदूम, शंकर जाधव आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
मागील ऊस देयकातील शिल्लक रक्कम द्या
मागील ऊस बिलातील संचित तोटय़ाला वर्ग केलेले १५२ रु पये त्वरित शेतकऱ्यांना परत करावे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी कायम असून, याबाबत भोगावती साखर कारखान्याने सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा केली आहे.
First published on: 23-11-2012 at 02:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last allotment sugercane payment should be give says swabhimani farmer assocation