तीर्थक्षेत्र आळंदी समस्यांच्या गर्तेत असून त्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचा आरोप करत आळंदीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी येथील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले.
आळंदी हे पवित्र तीर्थक्षेत्र असूनही तेथे घाणीचे साम्राज्य आहे. खड्डेमय रस्ते, वाहतुकीचा खोळंबा, उदासीन पोलीस यंत्रणा, अशुध्द पाणी, कचरा, धूर, डेंग्यू, दूषित नदीपात्र, बांधकाम आराखडा आदी समस्यांमुळे आळंदीकर त्रस्त आहेत. सर्वात महत्त्वाचा व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा ग्रामीण रुग्णालयाचा विषय आहे. आम्ही विरोधी पक्षात असल्याने आवाज दाबला जात आहे. प्रशासनाकडून दाद मिळत नाही, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. सरकारने आळंदीच्या विकासाचे गाठोडे हरणाच्या शिंगाला बांधले आहे. हरिण सापडले तर तुमचा विकास करू नाही तर भकासपणाच ठेवू, अशी विचित्र भूमिका घेतली आहे. सात डिसेंबरपासून कार्तिक यात्रा सुरू होत असूनही कसलेच नियोजन नाही. या सर्व प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
तीर्थक्षेत्र आळंदी समस्यांच्या विळख्यात राष्ट्रवादीचे ‘रास्ता रोको’ आंदोलन
तीर्थक्षेत्र आळंदी समस्यांच्या गर्तेत असून त्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचा आरोप करत आळंदीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी येथील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले.
First published on: 23-11-2012 at 02:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp road stops andolan problemmes are creating in anlandi