ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर जलकुंभ व टेकडी बंगला जलकुंभ येथील पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने बुधवारी शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
५ नोव्हेंबरला सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत शहरातील कोलबाड, खोपट, गोकुळनगर, चरई, धोबी आळी, एदलजी रोड, आंबेडकर रोड (डावी बाजू), विकास कॉम्प्लेक्स, एलबीएस रोड, चंदनवाडी, सिध्देश्वर तलाव परिसर, हंसनगर, टेकडी बंगला परिसर, नामदेववाडी, पाचपाखाडी, भक्ती मंदिर, आराधना सिनेमा, कचराळी तलाव परिसर इ. परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, असे महापालिकेने कळविले आहे.