विस्मरणाचा कधी विचार केलाय? तुम्हाला काय वाटतं? आपण जे पाहतो, वाचतो वा ऐकतो ते फक्त मेंदूच्या स्मृतिपटलांवरतीच साठवलं जातं? हजारो वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी मेंदूचे शवविच्छेदन करूनसुद्धा त्यांना मन सापडले नाही. मग मला सांगा एखाद्याने त्याच्या मनाच्या आतमध्ये साठवलेले ज्ञान त्यांना कधी सापडणार? आणि हो, याचा मात्र असा अर्थ घेऊ नका की, ज्ञान हे फक्त मेंदूत आणि मनातच साठवले जाते. कारण असं जर असतं तर ‘मेरे दिल को लगी हुयी चोट मैं कभी भूल नही सकता!’ असे म्हणण्याला काही अर्थच राहिला नसता. याचाच अर्थ आयुर्वेदाने सांगितलेले सत्य आहे.

असे आणखी कोणते तरी तत्त्व आहे की ज्यात आपण आपल्या स्मृती साठवून ठेवू शकतो. पण आपण विसरलो विसरलो म्हणतो म्हणजे नक्की काय विसरतो? ज्ञान घ्यायलाच विसरतो? योग्य कप्प्यात साठवायला विसरतो? की, ते कोणत्या कप्प्यात साठवले आहे हे आठवायलाच विसरतो? मग या विसरलेल्या गोष्टी नक्की जातात तरी कुठे? आणि थोडासा जरी बुद्धीला ताण दिला तरी त्या आठवतात तरी कशा? मग नक्की या विसरतात की, सापडत नाहीत?

Loksatta viva Monsoon diet A healthy life Medicine
पावसाळ्यातील आहारशैली
Facial Exercise For Glowing Skin Yoga for anti-ageing
कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या? फक्त ‘हे’ दोन योगा करा; नेहमीच दिसाल तरुण
driving tips to avoid accidents
हायवेवरील अपघातांपासून वाचण्यासाठी गाडी चालवताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
Rava sweet Appe for morning breakfast
सकाळच्या नाश्त्यासाठी खास ‘रव्याचे गोड आप्पे’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
Loksatta kutuhal Artificial intelligence and verbal communication
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाब्दिक संवाद
what is sleepwalking and why people walk in sleep
झोपेत चालल्याने इमारतीवरून पडून मुंबईत एकाचा मृत्यू; काय आहे हा आजार? लोक झोपेत का चालतात? तज्ज्ञ काय सांगतात….
do you get Love Marriage or Arranged Marriage
लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज? हाताच्या रेषा सांगतात, तुमचा विवाह कसा होणार?
Shani Sadesati when will mesh rashis shani sadesati will start people need to be careful
मेष राशीची साडेसाती नेमकी केव्हा सुरू होणार आहे? सावध राहण्याची गरज; जाणून घ्या, ज्योतिषशास्त्र काय सांगतात…

हेही वाचा… गच्चीवरची बाग: त्रयोदशगुणी विडा

खरंच बुद्धिवर्धक औषधांनी ही बुद्धी वाढते का? काय आहे नक्की या पाठीमागचे रहस्य? का आजकाल शाळेतील मुलाच्या, त्याच्या पालकाच्या विस्मरणात वाढ झाली आहे? एवढेच काय पण आज कित्येक घरांत कित्येक आजी-आजोबा या विस्मरणाने त्रस्त झाले आहेत. काही तर आपल्यात असूनही हरवूनच गेले आहेत. अल्झायमरचे प्रमाण वाढू लागले आहे.

आपलीच माणसे आपल्याच लोकांना जेव्हा ओळखत नाहीत तेव्हा काय होत असेल त्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे? का विस्मरण ही देवाने दिलेली देणगी समजून आपणही त्यावर काही शास्त्रोक्त उपाय आहे का हे जाणून न घेता विसरून जायचं? प्रश्न पडतोय न? हो हा खरंच विचार करण्यासारखा विषय आहे नाही तर आपल्या आयुष्यात आपण कितीही मोठे असलो तरी आपलाही ‘नटसम्राट’ व्हायला वेळ लागणार नाही. कारण छोटे छोटे विस्मरणच मोठ्या मोठ्या विस्मरणाला जन्म देत असते. म्हणून यावरील आयुर्वेद शास्त्रोक्त मत, प्रकार व उपचार आपण पुढील भागात जाणून घेऊ.

harishpatankar@yahoo.co.in